कोरोना काळात विनातिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडून ४ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात विनातिकीट आणि नियम मोडून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून १५ जून २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या काळात ४ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल केला अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उपनगरी तसंच लांब पल्याच्या गाड्यांसाठी हे विशेष अभियान चालवलं होतं. या काळात उपनगरी रेल्वे गाड्यांमधे १ लाख २१ हजार तर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या ३७ हजार ८२३ प्रवाशांकडून दंड वसूल केल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image