नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनम्र आदरांजली

  नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनम्र आदरांजली

मुंबई: नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र आदरांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या संदेशात म्हणतात, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी, कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्याची महाराजांची इच्छा स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन पूर्ण करणारे शूरवीर, नरवीर तानाजी मालुसरे यांचा आज स्मृतिदिन. नरवीर तानाजींनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाला आणि ‘गड आला, पण सिंह गेला’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक उद्गारांना आज साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. स्वतःपेक्षा स्वराज्याला, भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या, आपल्या बलिदानाने स्वराज्याचा पाया भक्कम करणाऱ्या, शूरवीर, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली.”

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image