माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थ व्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे; कोरोना टाळेबंदीमुळे जेव्हा संपूर्ण देश चार भिंतींच्या आत जखडून गेला होता तेव्हा आय टी क्षेत्रातल्या प्रतिभावंतांनी आपलं योगदान सुरू ठेवत अर्थव्यवस्थेला हातभार लावला अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचा गौरव केला.

नॅसकॉम टेक्नॉलॉजी अॅण्ड लीडरशिप फोरमला काही वेळापूर्वी संबोधित करताना मोदी म्हणाले की कोविड साथीच्या या कठीण काळात संपूर्ण जग भारताकडे अत्यंत विश्वासाने पाहत आहे. हा नवा भारत आणखी विकास, आणखी प्रगतीसाठी उत्सुक आहे.

नॅसकॉमची ही २९वी परिषद येत्या १९ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. राष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या नॅसकॉमचा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 'Shaping the future towards a better normal' अर्थात "नव्यानं पूर्वपदावर येण्यासाठी भविष्यनिर्माण" ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे.

या परिषदेत ३० पेक्षा जास्त देशांचे १६०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ३० हून अधिक उत्पादने सादर केली जाणार आहेत.   

 

 

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image