गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढची कार्यवाही तातडीनं करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पुढची कार्यवाही तातडीनं करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहेत. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसंच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, अडीअडचणी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात काल वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार सुनिल तटकरे, आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते गोसीखुर्द प्रकल्पातल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासंदर्भातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा अपर मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे कोकणात सुरु असलेले प्रकल्प, मागच्या काळात त्यामध्ये आलेले अडथळे, याबाबतही सविस्तर चर्चा झाली. ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत, असंही त्यांनी सांगितलं.
जलसंपदा विभागाअंतर्गत सुरु असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेवून, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून, ते पुर्ण करण्यासाठी अधिकचा निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.