प्रधानमंत्री 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवर उद्या सकाळी ११ वाजता 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा त्र्याहत्तरावा भाग आहे. या कार्यक्रमाचं आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सगळ्या वाहिन्यांवरून, तसंच आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि newsonair या मोबाइल अॅपवरून प्रसारण केलं जाईल.
याशिवाय आकाशवाणी, दूरदर्शनची वृत्तवाहिनी, प्रधानमंत्र्यां कार्यालय, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतरच त्याच्या स्थानिक भाषांमधल्या अनुवादनाचं प्रसारण होईल. याशिवाय स्थानिक भाषांमधल्या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता केलं जाईल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.