जेईई आणि नीट-२०२१ प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल नाही - केंद्रीय शिक्षण मंत्रालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट या २०२१ मध्ये होत असलेल्या प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही असे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

याशिवाय २०२१ मध्ये या परीक्षा देत असलेल्या उमेदवारांना उत्तरासाठीचे पर्यायही उपलब्ध असतील असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यानुसार विद्यार्थ्यांना ९० पैकी ७५ प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील असं या संदर्भात मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

२०२१ होणाऱ्या नीट या परीक्षेचं स्वरुप नेमकं कसं असेल, हे अजून जाहीर झालेलं नाही. मात्र देशातल्या काही शिक्षणमंडळांना अभ्यासक्रमात कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्रालयानं यासंदर्भातलं निवेदन जारी केलं आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image