राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यावर  

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ३०९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ७७ हजार ५८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.

काल ३ हजार ५७९ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या १९ लाख ८१ हजार ६२३ झाली आहे. सध्या राज्यभरात ५२ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ७० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला.

राज्यात या आजारामुळे दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २९१ झाली ११ असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५४ शतांश टक्के झाला आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image