केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांची येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमधली कृषीकायदासंदर्भातली नववी बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र, येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार आहे, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आजची बैठक समाधानकारक झाल्याचं सांगितलं आहे.
शेतकऱ्यांनी एका अनौपचारिक गटामार्फत निश्चित योजना सादर करावी आणि त्यावर पूढे औपचारिक बातचीत सुरु ठेवता येईल, असा प्रस्ताव सरकारनं शेतकऱ्यांना दिला आहे, अशी माहिती तोमर यांनी दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.