केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांची येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमधली कृषीकायदासंदर्भातली नववी बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र, येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार आहे, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आजची बैठक समाधानकारक झाल्याचं सांगितलं आहे.

शेतकऱ्यांनी एका अनौपचारिक गटामार्फत निश्चित योजना सादर करावी आणि त्यावर पूढे औपचारिक बातचीत सुरु ठेवता येईल, असा प्रस्ताव सरकारनं शेतकऱ्यांना दिला आहे, अशी माहिती तोमर यांनी दिली.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image