केंद्रीय समाज कल्याण खातं सक्षम करून भटक्या-विमुक्तांना विविध सवलती देण्याचा केंद्र शासनाचा विचार असल्याचं रामदास आठवले यांचं प्रतिपादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारचं समाज कल्याण खातं अधिक सक्षम करून भटक्या-विमुक्तांना विविध सवलती देण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे, अशी माहिती केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. ते आज नाशिकमधे बातमीदारांशी बोलत होते. भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध योजना तयार केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

औरंगाबादचे संभाजीनगर असं नामकरण करायला रिपब्लिकन पक्षाचा विरोध नाही, मात्र सध्या ती वेळ नाही, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नामकरणाचं राजकारण केलं जात आहे, असं आठवले म्हणाले .

केंद्र सरकारनं केलेले कृषी कायदे हे शेतकरी हिताचे आहेत. कायद्यात सुधारणा करणे ठीक पण कायदेच मागे घ्या ही मागणी सयुक्तिक नाही, असंही ते म्हणाले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image