मुंबई महानगरपालिकेनं ३१ मार्च २०२१ पर्यंत सात जंम्बो कोविड सेंटर सुरु ठेवायचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारी १ फेब्रुवारीपासून मुंबईतली उपनगरीय रेल्वेसेवा सर्व सामान्यांसाठीही सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, गर्दी वाढल्यानं, कोरोनाचे रुग्णही वाढायची शक्यता गृहीत धरून मुंबई महानगरपालिकेनं ३१ मार्च २०२१ पर्यंत सात जंम्बो कोविड सेंटर सुरु ठेवायचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयं कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. लोकल प्रवासादरम्यान मास्कचा वापर, परस्परांपासून सुरक्षित अंतराचा नियम पाळणं बंधनकारक असणार आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image