कोरोनावरची लस घेतली तरी जोपर्यंत कोरोनाचं समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत काळजी घ्यावीच लागेल - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनावरची लस घेतली तरी जोपर्यंत कोरोनाचं समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत काळजी घ्यावीच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल दैनिक सकाळच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.

कुठलंही ठोस औषध उपलब्ध नसताना कोरोनावर नियंत्रण मिळवणं मोठ दिव्य होतं, मात्र सर्व कोविड योद्ध्यांच्या सहकार्यानं आपण तेही करून दाखवलं. अनेक कोविड योद्धधे, सामाजिक संस्थांनी उत्तम कामगिरी बजावली.

धारावी पॅटर्नसोबतच इतर उपाययोजनांचं जगभर कौतुक झालं. पण धोका अजून टळलेला नाही, जाणकारांच्या मते इंग्लंडमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन संपूर्ण मानवजातीसाठी धोका आहे. त्यामुळे ते दिवस पुन्हा येऊ नयेत यासाठी मास्क घालणं, हात स्वच्छ धूत राहणं अशी काळजी घेत राहावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image