नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या जल्लोषामध्ये ३५ हजारापेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात येणार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या जल्लोषामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मुंबईमध्ये ३५ हजारापेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
COVID-१९ बाबतच्या नियमांची कडक अंमलबजावणी तसंच अनावश्यक घटना रोखणं हा यामागचा उद्देश असल्याचं पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज सांगितलं.
रात्रीच्या संचारबंदी बाबतच्या नियमांनुसार हॉटेल, रेस्टोरेंट आणि पब रात्री अकरा नंतर बंद राहतील, तसंच पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येण्यावर बंदी राहील असं ते म्हणाले.
या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.