देशात सर्वदूर वीज पोहचवण्यात केंद्र सरकारनं लक्षणीय यश प्राप्त केलं आहे -आर.के.सिंग

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वदूर वीज पोहचवण्यात केंद्र सरकारनं लक्षणीय यश प्राप्त केलं आहे, असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी आकाशवाणीचा दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

गेल्या १८ महिन्यांच्या कालावधीत कोरोनाच्या जागतिक महामारीचा सामना करत असतानाही देशात सुमारे दोन कोटी ८० लाख  नवीन ग्राहकांपर्यंत वीज पोहोचली असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक घरात २४ तास वीज वितरित करण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्नात कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गेल्या सहा-साडे  सहा  वर्षांमध्ये रालोआ सरकारच्या कार्यकाळात भारतानं अतिरिक्त वीज निर्मिती करणारं राष्ट्र असा दर्जा प्राप्त केला आहे, भारत आता  देशांतर्गत मागणी समवेत बांगलादेशसह इतर शेजारी राष्ट्रांनाही वीज पुरवण्यात सक्षम झाल्याचं ऊर्जामंत्री म्हणाले.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image