नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नागपुरात दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला झालेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला केंद्राच पथक आज नागपुर जिल्ह्यात दाखल झालं. या पथकानं कामठी तालुक्यातल्या गुमथाळा या गावाला भेट दिली आणि शेतकऱ्यांकडून पूरपरिस्थितीची माहिती घेतली. 

त्यानंतर पथकानं कामठीसह परशिवनी आणि मौदा तालुक्यातही  पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नागपूरसह पूर्व विदर्भात ऑगस्ट महिन्यात झालेल्या पूरस्थितीमुळे नागपूर जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातली ६१ गावं, तर नागपूर विभागातल्या १४ तालुक्यातले ९० हजार ८५८ नागरिक बाधित झाले होते.

आज केंद्राची ३ पथकं पूर्व विदर्भातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. पहिलं पथक नागपुरात, दुसरं गडचिरोली तर तिसरं पथ चंद्रपूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image