राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक २९ शतांश टक्के

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २ हजार १२४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक २९ शतांश टक्के झाला आहे. काल ३ हजार ३१४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख १९ हजार ५५० झाली आहे.

सध्या राज्यात ४ लाख ६० हजार ७०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल ६६रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूणसंख्या, ४९ हजार २५५ झाली असून, मृत्यू दर २ पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. मुंबईत काल ४९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आलं.

आतापर्यंत २ लाख ७० हजार ६२८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल ५७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत रुग्णांची संख्या २ लाख ९० हजार ९१४ झाली आहे.

मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ३६४ दिवसांवर पोचला आहे. सध्या ८ हजार ३५५ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतला मृतांचा आकडा ११ हजार ७६वर पोचला आहे.

Popular posts
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image