देशभरात काल कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका झाला आहे. काल देशभरात कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत देशात ७९ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या ५ लाख ५ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ३८ हजार ७४ नवीन कोरोनाबाधित आढळल्यानं देशभरातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८५ लाख इतकी झाली आहे. काल ४४८ रुग्णांचा मृत्यू झाला.

देशाचा कोरोना मृत्यूदर सध्या १ पूर्णांक ४८ शतांश टक्के इतका आहे. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी आखलेली रणनीती, कोरोनाबाधितांचा शोध, चाचण्या आणि उपचार यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.


Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image