महिलांविरोधातले अत्याचार रोखण्यासाठी राज्यात दिशा कायदा पारित करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन


मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांविरोधातले अत्याचार रोखण्यासाठी येत्या अधिवेशनात राज्यात तामिळनाडूच्या धर्तीवर दिशा कायदा पारित करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं विष्णू नारायण मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमानंतर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. 

रावेर प्रमाणे सारंगखेडा इथं झालेल्या मुलीच्या हत्या प्रकरणाचा  खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातलं महाआघाडीचं  सरकार मजबूत असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. 


Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image