राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यावर


 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ६०८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३० हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ७५ शतांश टक्के इतका आहे. काल आणखी पाच हजार ११ कोरोना बाधितांची नोंद झाली.

  त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ५७ हजार ५२० झाली आहे. सध्या ८० हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.काल १०० जणांचा उपचारादरम्यान मृत्यूझाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४६ हजार २०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image