राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यावर
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ६०८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३० हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ७५ शतांश टक्के इतका आहे. काल आणखी पाच हजार ११ कोरोना बाधितांची नोंद झाली.
त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ५७ हजार ५२० झाली आहे. सध्या ८० हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.काल १०० जणांचा उपचारादरम्यान मृत्यूझाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४६ हजार २०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.