प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामांनाच जनतेचा कौल मिळतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामे केली की जनतेचा भरभरून आशिर्वाद मिळतो हे बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातल्या पोटनिवडणुकांमधून सिद्ध झाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बिहार विधानसभेतल्या यशानंतर काल दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना उद्देशून ते बोलत होते.

भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकास कामांमुळेच जनतेचा विश्वास आणि लोभ मिळत असल्याचे ते म्हणाले. लोकशाहीच्या या उत्सवात सामील होऊन एन.डी.ए.ला कौल दिल्याबद्दल त्यांनी विविध राज्यातल्या जनतेचे आभार मानले; तसेच कोविड काळात सर्व नियम पाळत निवडणुका घेतल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाचेही आभार मानले.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image