राज्यात १५ लाख १४ हजार ७९ रुग्ण कोरोनामुक्त


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ७२६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख १४ हजार ७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक ९२ शतांश टक्के झालं आहे.

  काल दिवसभरात आणखी पाच हजार ३६९ कोरोना बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ८३ हजार ७७५ झाली आहे. राज्यभरात काल ११३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४४ हजार २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यूदर २ पूर्णांक ६१ टक्के आहे. सध्या एक लाख २५ हजार १०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image