भारतीय सैन्याने उत्तर सिक्कीममध्ये चिनी नागरिकांची सुटका केली


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 3 सप्टेंबर 2020 रोजी 17,500 फूट उंचीवर, उत्तर सिक्कीमच्या पठार भागात रस्ता चुकलेल्या तीन चिनी नागरिकांना भारतीय सैन्याने मदतीचा हात दिला.


उणे तापमानात अडकलेल्या त्या तीन चिनी नागरिकांच्या जीवाला धोका आहे हे लक्षात येताच  ज्यामध्ये दोन पुरुष व एक महिला होती, त्या उंच जागेवरून आणि कठीण हवामान परीस्थितीमध्ये त्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय सैनिक तातडीने त्याठिकाणी ऑक्सिजन, अन्न आणि गरम कपडे घेऊन पोहोचले.


भारतीय सैन्याने त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले त्यानंतर ते परत गेले. तातडीने मदत केल्याबद्दल, चिनी नागरिकांनी भारत आणि भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image