विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास आज सुरु होणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची ख्यातनाम विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास आज सुरु होणार आहे. तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर गुजरातमधल्या अलंग इथल्या जहाज तोडणी कारखान्यात तिचे सुट्टे भाग केले जातील. २०१७ मधे ही युद्धनौका निवृत्त झाली होती.

त्यानंतर वस्तूसंग्रहालय किंवा अलिशान रेस्त्रॉमधे तिचं रुपांतर करण्याचा प्रस्ताव होता, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अंतिमतः विराट मोडित काढण्याचं ठरलं, त्यात श्रीराम समुहानं लिलावात बाजी मारली. दोन दिवसाचा प्रवास करुन विराट अलंगला पोहोचेल.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image