टाळेबंदीचा कालावधी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी उपयुक्त - आरोग्य मंत्रालय


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे सुमारे १४ ते २९ लाख नागरिकांना विषाणू संसर्गापासून वाचवण्यात आलं; तसंच या काळात कोविडमुळे होणारे ३७ ते ७५ हजार संभाव्य मृत्यू रोखण्यात आले अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं राज्यसभेत दिली आहे.

टाळेबंदीचा हा चार महिन्यांचा कालावधी देशातली आरोग्य यंत्रणा बळकट करणं , आरोग्य क्षेत्रातलं मनुष्यबळ वाढवणं आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यासाठी उपयुक्त ठरला असल्याची माहिती;  केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image