सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करण्याच्या मागणीवर केंद्र सरकारनं उत्तर द्यावं - सर्वोच्च न्यायालय



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातली सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्रसरकारनं उत्तर द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. 



कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली  देशभरातली प्रार्थनास्थळं उघडण्याची परवानगी अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यावर देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रासह काही राज्यांनी यासाठी अद्याप परवानगी दिली नाही, यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असल्याचं अहमदाबाद इथल्या एका संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. 


या पार्श्वभूमीवर, सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पिठासमोर आज सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयानं  केंद्रीय गृहमंत्रालयाला नोटीस बजावली असून देशातली प्रार्थनास्थळं उघडण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले आहेत.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image