राज्यात आतापर्यंत कोविड-19 चे 7 लाख 28 हजार 512 रुग्ण बरे होऊन घरी परतले
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-19 चे 13 हजार 489 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आता पर्यंत एकंदर 07 लाख 28 हजार 512 रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 70 पूर्णांक 2 दशांश टक्के झालं आहे.
राज्यात काल कोविड-19 च्या 22 हजार 84 नवीन रुग्णांचं निदान झालं.त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या दहा लाख ३७ हजार ७६५ झाली आहे. तर 391 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली, त्यामुळे एकंदर मृत्यु संख्या 29 हजार 115 वर पोचली. सध्या राज्याचा मृत्यूदर 2 पूर्णांक 81 शतांश टक्के आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.