ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 वर


मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 झाली आहे, यामध्ये सात बालकांचा समावेश आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत एका चार वर्षाच्या बालकासह 20 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकले असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

भिवंडीतली ही तीन मजली इमारत आज सकाळी कोसळली. या इमारतीत ४० सदनिका होत्या, ज्यामध्ये जवळपास दीडशे लोक राहत होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.


मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. भिवंडी पालिका हद्दीत क्लस्टर योजना आणावी लागेल, त्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.


Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image