1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरच्या टोलच्या दरात पाच ते 25 रुपयांची वाढ


मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या 1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि एल. बी एस या पाचही प्रवेशद्वारावरील टोलच्या दरात पाच ते 25 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबईतल्या 55 उड्डाण पुलांचा खर्च भरून काढण्यासाठी या पाचही टोल नाक्यांची निर्मिती करण्यात आली होती. 2002 ते 2027 अशी कालमर्यादा निश्चीत केली होती.

राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होते. लहान वाहनांच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. तर 20 आसनी बसच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मोठ्या बस आणि ट्रकच्या दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.


Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image