मास्क न वापरणाऱ्या लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढल्याचा आय.सी.एम.आरचा दावा
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढला असल्याचा दावा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था अर्थात, आय.सी.एम.आरनं केला आहे.
आय.सी.एम.आरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी वार्ताहरांना काल ही माहीती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव केवळ तरुण किंवा वृद्धांमार्फतच नव्हे, तर मास्क न वापरणाऱ्या तसंच शारीरिक अंतर नं राखणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे होत असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
सेरो सर्वेक्षण चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.