कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १८ हजार गुन्हे दाखल; ३२ हजार व्यक्तींना अटक


मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १८ हजार ०५९ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३२ हजार ४३३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच १८ कोटी १ लाख ३९ हजार ९०४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत


अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ७९ हजार ५४७ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.


पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३२४ (८८३ व्यक्ती ताब्यात)


१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०९ हजार ०१६


राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.


अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४६


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –


(मुंबईतील ५१ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५५, ठाणे शहर १२  व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना एसआरपीएफ १ अधिकारी, नवी मुंबई  एसआरपीएफ १, पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी, ए.टी.एस. १,उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर १,जालना ग्रामीण १, नवी मुंबई १, सातारा१, अहमदनगर १,औरंगाबाद रेल्वे १,एसआरपीएफ अमरावती १)


कोरोना बाधित पोलीस – २१८पोलीस अधिकारी व १७१६ पोलीस कर्मचारी


कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image