सर्व राज्यांना त्यांनी व्यक्त केलेल्या गरजेनुसार पुरेसा खत पुरवठा वेळेवर केला जाईल,अशी केंद्र सरकारची ग्वाही


नवी दिल्ली : पेरणीचा हंगाम सुरु होण्याआधी सर्व राज्यांना त्यांनी व्यक्त केलेल्या गरजेनुसार पुरेसा खत पुरवठा वेळेवर केला जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे.


मान्य केलेल्या योजनेनुसार काटेकोरपणे पुरवठा करण्याच्या सूचना खत पुरवठादारांना दिल्या आहेत, त्यानुसार रोज पुरवठा होतोय का यावर खत विभागाचं बारकाईनं लक्ष राहील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 


चालू महिन्यात ३ लाख १५ हजार टन युरिया लागेल असा अंदाज होता, त्यामुळे सरकारनं ४ लाख ३४ हजार टन युरिया उपलब्ध होईल याची व्यवस्था केल्याचं यात म्हटलं आहे. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image