देशातला सर्व भूभाग भारताच्या अधिपत्याखाली आणि सुरक्षित असल्याचं संरक्षण दलाचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला सर्व भूभाग भारताच्या अधिपत्याखाली आहे आणि ही जमीन देशाच्या सुरक्षा दलांकडे पूर्णपणे सुरक्षित आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या दलांचे महासंचालक एस एस देसवाल यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
ते आज भोंडसी इथं एका कार्यक्रमानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. पूर्व लडाखमधल्या आताच्या परिस्थितीची चिंता करायचं कारण नसून लडाखची पूर्व, पश्चिम तसच उत्तर अशा सर्वच सीमा अत्यंत सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आपली सुरक्षा दलही सक्रिय आणि समर्पित भावनेनं काम करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आपली सुरक्षा दल जीवावर उदार होउन देशाचं रक्षण करतात असं. गौरवोद्गार देसवाल यांनी काढले आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.