१ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंतच्या नियमित गाड्यांच्या आरक्षित तिकीटांचे सर्व पैसे परत देण्याचा रेल्वेचा निर्णय
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवाशांनी १ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीतल्या नियमित गाड्यांच्या आरक्षित केलेल्या रेल्वे तिकीटाचे सर्व पैसे परत देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या सर्व गाड्या रेल्वेनं नुकत्याच १२ ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.