कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा तातडीनं शोध घेऊन त्यांची तपासणी करावी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जळगांव जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा तातडीनं शोध घेऊन त्यांची तपासणी करावी असे निर्देश, केंद्रीय समितीनं काल भुसावळ इथं झालेल्या आढावा बैठकीत दिले. जिल्ह्यातल्या कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी, दोन सदस्यांचं केंद्रीय पथक, जिल्ह्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे.
जिल्ह्यातला मृत्यूदर कमी करण्यासाठी नगरपालिकेनं नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करावी, या तपासणीत ६० वर्षावरील नागरिकांची तपासणी प्राधान्यानं करावी, अशा व्यक्तींना इतर कुठलेही आजार असतील तर त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावं, प्रतिबंधित क्षेत्रात बाहेरच्या कुणाही नागरिकांची ये– जा होणार नाही याची दक्षता घ्यावी, याकरता प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरीकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा वेळेवर उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पथकानं या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात ५० फिरते दवाखाने विविध परिसरात जाऊन प्राथमिक तपासणी आणि चाचणी करून कोरोना बधितांचा शोध घेणार आहे.
या शीघ्र कृती कार्यक्रमाचा शुभारंभ आज महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते अंधेरी इथल्या शहाजी राजे क्रीडा संकुलात करण्यात आला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.