अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी


मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. हा निर्णय महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाला धरून नसल्याचं, अभाविपने म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.


सध्या परीक्षा रद्द करून सरासरी गुण देणं आणि परिस्थिती निवळल्यानंतर विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी एक संधी देण्याची घोषणा करणं, हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नुकसानदायक असल्याचं, अभाविपनं म्हटलं आहे.


Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image