केंद्र सरकारने १४ धान्यांची किमान आधारभूत किंमत ५० ते ८३ टक्क्यांनी वाढविली.
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने १४ धान्यांची किमान आधारभूत किंमत वाढविली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीकाच्या खर्चाच्या तुलनेत ५० ते ८३ टक्के परतावा मिळू शकणार आहे. तांदूळ ५३ रुपये, ज्वारी ७0रुपये, बाजरी १५० रुपये, नाचणी १४५ रुपये, मका ९० रुपये, तूर २०० रुपये, मूग १४६ रुपये, उडीद ३०० रुपये, भूईमूग १८५ रुपये, सूर्यफूल २३५ रुपये, सोयाबीन १७० रुपये, तीळ ३७० रुपये, कापूस २६० रुपये, अशी ही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसंच वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्क्यांपर्यंत व्याजात सवलतही दिली जाणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.