मृतदेहावर दफनविधी करण्याबात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मृतदेहावर दफनविधी करणे हा मूलभूत अधिकार असून सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा कोणाचाही हा अधिकार डावलता येऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणानुसार शवांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होत असल्याची कोणतीही ठोस माहिती पुढे आले नसल्याच न्यायालयानं सांगितलं आहे.

कोविड-१९ मुळे निधन झालेल्या रुग्णांच्या दफनविधीला परवानगी नाकारणारं याआधी जारी केलेलं परिपत्रक मुंबई महानगरपालिकेनं न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घेतलं आहे. जागतिक आरोग्य संघटना तसंच भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करतानाच ज्या समुदायांमध्ये मृत्यनंतर दफनविधी महत्वाचं मानला जातो त्यांच्या भावनांचा आदर राखत मृतदेहांची विल्हेवाट लावण्याबाबत पालिकेनं योग्य व्यवस्थापन करावं, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 


 


 


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image