कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांचं घटनापीठ आजपासून दैनंदिन तत्वावर सुनावणी करत आहे. कलम ३७० आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ च्या तरतुदी रद्द करण्याला आव्हान देणार्‍या अनेक याचिका दाखल झाल्या होत्या, त्या घटनापीठाकडे पाठवण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image