गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत, महिलांना मारहाण केली जातेय, तरीही राज्याचे गृहमंत्री काहीही करत नाहीत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी आज ठाण्यात, हल्ला झालेल्या रोशनी शिंदे हिची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. त्यावर, आपण गृहमंत्री असल्यानं अनेकांना अडचण होते आहे, परंतु टीका करणाऱ्यांना जनताच उत्तर देईल असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडनवीस म्हटलं आहे. ते आज यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. कुठल्याही घटनेची निष्पक्ष चौकशी आपलं सरकार करेल, परंतु त्यावर राजकारण करू नये, असं ते म्हणाले.
तर, विरोधी पक्ष म्हणून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करावी परंतु देवेंद्र फडनवीस यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर केलेली टीका खपवून घेणार नाही, वेळ पडली तर मातोश्रीबाहेरसुद्धा या विरोधात आवाज उठवू, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.