राहुल गांधींवर अनुराग ठाकूर यांची टीका

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगासस हेरगिरीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी कडक टीका केली आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधी परदेशात भारताची प्रतिमा मलीन करत असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगभरात भारताचा सन्मान वाढल्याचं ते यावेळी म्हणाले. कालच्या निवडणुकीत काँग्रेला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे, तरी मतदारांनी दिलेला  कल विरोधी पक्षांनी स्वीकारला नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image