ऑल इंडिया रेडिओच्या मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन स्पर्धा
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन अर्थात बोधचिन्ह निर्मिती साठी आकाशवाणीनं आयोजित केलेली स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी श्रोते १५ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठवू शकतात. स्पर्धकांनी तयार केलेलं डिजिटल बोधचिन्हं कुठेही वापरता येईल असं असणं आवश्यक आहे. विजेत्याला एक लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. स्पर्धेचा विस्तृत तपशील mygov.in वर उपलब्ध आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.