टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर पाच धावांनी विजय
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ॲडलेड इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर पाच धावांनी विजय मिळवला. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के.एल. राहुलनं ३२ चेंडूत ५० धावा तर विराट कोहलीनं ४४ चेंडूत केलेल्या नाबाद ६४ धावांच्या खेळीमुळे भारताला निर्धारीत २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा करता आल्या. त्यात सूर्यकुमार यादवनं ३० धावांचं मोलाचं योगदान दिलं. बांगलादेशातर्फे हसन मेहमूदनं ३ तर शकील अल हसननं २ गडी बाद केले. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे बांगलादेशाला विजयासाठी १६ षटकात १५१ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. मात्र त्यांना ६ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. लिटन दासनं २७ चेंडूत केलेली ६० धावांची झुंजार खेळी इतरांची साथ न मिळाल्यानं संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. भारतातर्फे अर्शदीप सिंग आणि हार्दीक पांड्यानं प्रत्येकी दोन, तर महम्मद शमीनं एक बळी मिळवला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.