टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर पाच धावांनी विजय

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ॲडलेड  इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर पाच धावांनी विजय मिळवला. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के.एल. राहुलनं ३२ चेंडूत ५० धावा तर विराट कोहलीनं ४४ चेंडूत केलेल्या नाबाद ६४ धावांच्या खेळीमुळे भारताला  निर्धारीत २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा करता आल्या. त्यात सूर्यकुमार यादवनं ३० धावांचं मोलाचं योगदान दिलं. बांगलादेशातर्फे हसन मेहमूदनं ३ तर शकील अल हसननं २ गडी बाद केले. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे बांगलादेशाला विजयासाठी १६ षटकात १५१ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. मात्र त्यांना ६ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. लिटन दासनं २७ चेंडूत केलेली ६० धावांची झुंजार खेळी इतरांची साथ न मिळाल्यानं संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. भारतातर्फे अर्शदीप सिंग आणि हार्दीक पांड्यानं प्रत्येकी दोन, तर महम्मद शमीनं एक बळी मिळवला.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image