मुंबईतून ५० किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त

 


मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं काल मुंबईत छापा टाकून सुमारे ५० किलो वजनाचे अंमली पदार्थ पकडले. यासंदर्भात ६ जणांना अटक केली असून, त्यातला एकजण पूर्वी एअर इंडियात वैमानिक होता. नौदल गुप्तचर विभागाकडून खबर मिळाल्यावर गेल्या सोमवारी गुजरातमधे जामनगर इथं १० किलो वजनाचे अंमली पदार्थ पकडले होते. त्यात जामनगरच्या एकाला आणि मुंबईच्या ३ जणांना अटक झाली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे काल मुंबईच्या फोर्ट परिसरात कारवाई करण्यात आली आणि सुमारे ५० किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यावेळी दोघांना अटक करण्यात आली. विभागाचे क्षेत्रीय संचालक अमित घावटे यांनी सांगितलं की, या एकूण साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १२० कोटी रुपये आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image