ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

 


ठाणे : श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज उपस्थिती लावली.

यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, भगवात कथाकार देवकीनंदन ठाकूर जी महाराज, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे, आयोजक श्वेता शालिनी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, भागवत कथेचे महत्व खूप आहे. पुढील पंचवीस वर्षे देशात अमृतकाल येणार आहे.  पुढील सात दिवस व्यासजीच्या भागवत अमृत कथेचे मनःपूर्वक श्रवण करून लाभ घ्यावा.

 

यावेळी श्री. देवकीनंदन ठाकूरजी यांच्या हस्ते राज्यपाल महोदयांचा सत्कार करण्यात आला.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image