ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

 


ठाणे : श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज उपस्थिती लावली.

यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, भगवात कथाकार देवकीनंदन ठाकूर जी महाराज, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे, आयोजक श्वेता शालिनी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, भागवत कथेचे महत्व खूप आहे. पुढील पंचवीस वर्षे देशात अमृतकाल येणार आहे.  पुढील सात दिवस व्यासजीच्या भागवत अमृत कथेचे मनःपूर्वक श्रवण करून लाभ घ्यावा.

 

यावेळी श्री. देवकीनंदन ठाकूरजी यांच्या हस्ते राज्यपाल महोदयांचा सत्कार करण्यात आला.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image