एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधल्या रांची इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं सात गड्यांच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या. एडन मरक्रम ७९ आणि रिझा हेंड्रिक्सनं ७४ धावा केल्या. भारताच्या मोहम्मद सिराजनं तीन बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदर, शहाबाद अहमद, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने हे आव्हान तीन गड्यांच्या मोबदल्यात केवळ २५ षटक आणि पाच चेंडूत पूर्ण केलं. श्रेयश अय्यरनं  नाबाद ११३ आणि ईशान किशन ९३ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या मालिकेतला शेवटचा सामना उद्या दिल्ली इथं अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. 

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image