आरक्षण मिळवलं म्हणजे काम संपलं नाही, ओबीसी एकत्र आले पाहिजेत - छगन भुजबळ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आरक्षण मिळवलं म्हणजे काम संपलं नाही, ओबीसी एकत्र आले पाहिजेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीन आयोजित कृतज्ञता मेळाव्यात बोलत होते. ओबीसी तरूणांना नोकऱ्या पाहिजेत. त्यासाठी उद्योग महाराष्ट्रात आणले पाहिजेत. त्यासाठी आता आवाज उठवावा लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, असं ते म्हणाले.

आपल्या कामावर विश्वास ठेवा आणि पळापळी करू नका असा सल्लाही भुजबळ यांनी यावेळी उपस्थितांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, आदि मान्यवर उपस्थित होते. केंद्र सरकार राज्यातले अनेक प्रकल्प काढून घेत आहे. महाराष्ट्राचं, मुंबईचं महत्व कमी केलं जात आहे. राज्याचा अभिमान जपत युवकांनी हा विषय हातात घेतला तरच परिवर्तन होऊ शकतं, असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी यावेळी केलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image