राज्यात दहा कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

 

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या  शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत  दहा कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 10 कोटी 71 हजार 959 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 15 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2021 या काळात 2 कोटी 70 लाख 51 हजार 472  मोफत थाळ्यांचा समावेश आहे.राज्यात सद्यस्थितीत १५२८  शिवभोजन  केंद्र सुरू आहेत.

राज्यात शिवभोजन योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कार्यरत शिवभोजन केंद्रांवर परिणामकारक नियंत्रण ठेवण्याकरिता राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे अनिवार्य केलेले आहे. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शिवभोजन केंद्रांच्या १०० मीटर परिघामध्ये जिओ फेन्सिंग सुविधाही सुरु आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रचालकांना शिवभोजन केंद्राच्या १०० मीटर परिघामध्येच शिवभोजन योजनेचे व्यवहार (Transactions) करता येतात.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image