२०१६ ते २०२१ या कालावधीत दरवर्षी सुमारे साडे पाच कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला असून मोठ्या संख्येने ते या योजनेशी जोडले गेले आहेत' असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज व्यक्त केले. सध्या सुरू असलेल्या 'किसान भागिदारी, प्राथमिकता हमारी' या मोहिमेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष 'पिक विमा कार्यशाळा' या अभियानामध्ये तोमर यांनी सहभाग घेतला.

या कार्यशाळेत देशाच्या विविध भागांतील सुमारे १ कोटी शेतकरी बांधव सहभागी झाले होते. पिक विमा योजनेअंतर्गत खरीप २०१६ ते खरीप २०२१, या कालावधीत दरवर्षी सुमारे साडे पाच कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला. त्यांनासुमारे १ लाख १५ हजार कोटी रुपये पीक विम्याचा दावा म्हणून देण्यात आले, असंही तोमर यांनी सांगितलं.

लाभार्थ्यांनी या योजनेचा अधिकाधिक प्रसार करून अन्य शेतकरी बांधवांनाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहनही कृषि मंत्र्यांनी यावेळी केलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image