यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ च्या खरीप विपणन हंगामात ७ कोटी ५० लाख टन धान खरेदी केली असल्याचं ग्राहक कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे.

देशातल्या एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना या खरेदी प्रक्रियेचा फायदा झाला असून त्यांना किमान आधारभूत किमतीनुसार एकूण एक लाख ४७ हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.

याशिवाय, सरकारनं २०२२-२३ च्या रब्बी हंगामासाठी मध्य प्रदेश, हरियाना, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून गव्हाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. या महिन्याच्या तीन तारखेपर्यंत ३४ हजार ९१७ टन गहू खरेदी करण्यात आला आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image