भारत ही जगासाठी औषध निर्मितीची राजधानी - केंद्रीय आरोग्यमंत्री
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत ही जगासाठी औषध निर्मितीची राजधानी ठरली आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयडीएमए अर्थात भारतीय औषध निर्माण उद्योग संघटनेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्राच्या उद्धाटनसमारंभात बोलत होते. सध्याचं सरकार गरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं असतानाच उद्योगस्नेही देखील आहे, असं ते म्हणाले. देशाच्या विकासात उद्योगांची भूमिका महत्वाची असते, देशाला स्वंयपूर्ण करण्यातही उद्योग महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यात औषधनिर्मिती उद्योग आघाडीवर आहे, असं त्यांनी सांगितल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.