डिजिटल युगात स्टार्टअप कंपन्या भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळख प्राप्त करून देण्यासाठी सक्षम - पियुष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या डिजिटल युगात स्टार्टअप कंपन्या भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळख प्राप्त करून देण्यासाठी सक्षम आहेत, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. सोळाव्या इंडिया डिजिटल संमेलनाचं उदघाटन, काल गोयल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. डिजिटल युगात तंत्रज्ञानानं सीमा आणि इतर मर्यादांना मागे टाकलं असून देशातले उद्योग आता सीमांच्या बंधनातून मुक्त झाले आहेत, असं ते म्हणाले. स्टार्ट अप कंपन्यांनी ग्रामीण क्षेत्रातल्या सूक्ष्म उद्योगांना सहाय्य करावं, त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञाचा वापर करावा, शेतकरी, विणकर आणि कारागिरांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यासाठी प्रेरित करावं, असं आवाहन गोयल यांनी केलं. स्टार्ट अप इंडिया अभियानाला सहा वर्ष पूर्ण झाली असून या काळात स्टार्ट अप्स मुळे देशात ६ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली, असं त्यांनी सांगितलं. 

 

 

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image